मुंबई : शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळाव्यावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची यावरून वाद सुरू आहे. तसेच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदान मिळवण्यासाठी दोन्ही बांजूनी महापालिकेत अर्ज सादर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा संपूर्ण देशाला मिळते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट म्हणून आम्ही महापालिकेत अर्ज केला आहे. दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”
तसेच उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीतून बाहेर पडलं. अन् राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ सोडली तर त्यांचं आम्ही स्वागत करू. मात्र त्यांची ही भूमिका त्यांनी जाहीरपणे स्पष्ट करावी. असं झालं तर शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांचेच विचार प्रकट होतील. हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल असं देखील राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल
- पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
- “पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी”, भाजपची मागणी, शरद पवार म्हणाले, “लवकर करा, नाहीतर..:”
- “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
- “तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं