मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे नुसतं धनुष्यबाण नव्हतं. ते शिवधनुष्य होतं. ते बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, झेपणार नाही, हे मला माहित होतं. एकाला झेपलं नाही. आता दुसऱ्याला झेपतं की नाही? हे माहीत नाही. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. त्याेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या वाटल्या म्हणून मी बोलतोय. मला पुन्हा या गोष्टींचा चिखल करायचा नाही. घरातल्या गोष्टी बाहेरही काढायच्या नाहीत. मी आताच त्यांच्या बाजूच्या लोकांना सांगतो, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. त्यानंतर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही. असा इशाराही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
मी शिवसेना सोडल्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला. त्यामुळे मला काही गोष्टी सांगाव्या लागत आहेत. मी एकेदिवशी उद्धव सोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलं. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे ? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे, सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय ? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस, कारण मी प्रचाराला बाहेर पडतो आणि नंतर दिसत नाही. लोकांना मला तोंड दाखवता येत नाही. मला सांग की मी नेमंक काय करायचं आहे? मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना. तो म्हणाला हो ठरलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी एक जुनी आठवण सांगितली.
Read also
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”