मुंबई : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विधान परिषदेची पोट निवडणुक आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरती त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे पटोलेंनी माध्यमांना सांगितलं.
झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम
तसेच निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. त्यामुळे ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी बोलणी केली असून यावरती देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षात चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती पटोलेंनी दिली. तसेच चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडले, आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पटोले म्हणाले.
“अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”
तसेच पटोलेंना शरद पवारांनी केलेल्या नागपूर दौऱ्याबद्दल विचारलं असता पटोले म्हणाले ते ‘आम्हाला काही अडचण नाही. सर्वानी आपला पक्ष वाढवावा. आम्ही बारामतीमध्ये गेलो तर त्यांना अडचण नसावी.’ असं देखील ते यावेळी म्हणाले. तर नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणले ‘आम्ही कधी कोणाच्या दौऱ्यावरती आक्षेप घेतला नाही ते बारामतीला येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांना बारामतीला यायचं असेल, अनेकजण येतात बारामतीला येतात असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also :
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
- माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं
- विदर्भ दौऱ्या दरम्यान शरद पवारांना आली अनिल देशमुखांची आठवण; म्हणाले..
- गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला