मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, ठाकरे सरकारच्या ११ घोटाळेबाज नेत्यांची नावे सांगितली होती. त्यांनतर त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यवर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. तसेच, या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावे आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं सांगितले होते. तसेच, त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे आहेत आणि यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितले होते.
मोठी बातमी: हसन मुश्रीफांनी केला १२७ कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी आरोप
त्यानुसार आज सोमैया २७०० पानी पुरावे घेऊन दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी, ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत त्यांची सविस्तर बैठक झाली. त्यांनतर २७०० पानी कागदोपत्री पुरावे ED कडे सुपूर्त केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. यावेळी, ‘काल मुश्रीफ बोलत होते. आज मी सांगतो, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात त्यांनी घोटाळा केला आहे. या कंपनीत मुश्रीफ परीवार शेअर होल्डर आहेत,’ असा दावा त्यांनी केला.
मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
‘शेतकऱ्यांनी या कारखान्यात गुंतवणूक केली. पण मुश्रीफ परिवारातील ६ व्यक्तींचा देखील यात सहभाग आहे. त्यात अबिद हसन मुश्रीफ ,नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ यांचा समावेश असून, या व्यक्तींच्या नावाने १३ कोटी ३० लाख ४९ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार करून काळा पैसा पांढरा केला आणि मनी लाँड्रिंग करून ७८ कोटी ९१ लाख ५१ हजार ८३० रुपयांचे शेअर घेतले,’ असा दावा त्यांनी केला आहे.
‘धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा,’
दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांनी सोमैयांचे सगळे आरोप फेटाळून लावले असून, ‘मी त्यांच्यावर आत्तापर्यंत ५०-५० कोटींचे अब्रुनुकसानीचे ६ दावे दाखल केले आहेत. आता ७ वा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही आरोप केला नाही. भाजपसारखे चिक्की घोटाळे आम्ही केले नाही. त्यांच्यवर येत्या २ आठवड्यात फौजदारी दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात दाखल करतोय,’ असं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- मनसेच्या टार्गेटवर पुन्हा परप्रांतीय? शालिनी ठाकरेंचं गृहमंत्र्यांना १० मागण्यांचं निवेदन
- 48 तासात दरेकरांनी माफी मागावी, अन्यथा दिसेल तिथे गाठून तोंड काळ करू – राष्ट्रवादी आक्रमक
- परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?
- …तर मी पदाचा राजीनामा देतो; मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
- हसन मुश्रीफांना कोणी ओळखत नाही, पेपरमध्ये बातमी यावी म्हणून, माझ्यावर आरोप करतात – समरजीत घाटगे