मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
किरीट सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आयुक्ताशीं भेटण्यापूर्वी मीडियाशी बोलताना सोमय्या यांनी हा गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
सुनेच्या गंभीर आरोपानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
मी माझे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक जण घोटाळेबाज आहेत. उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत. पण मी सुरक्षा मागितली नाही. मागणारही नाही. माझाबाबत जी धमकी आली ते फक्त नाटक आहेय नुसती एनसी पोलिसांनी घेतली, असंही ते म्हणाले.
पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असं ते म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 21 पक्ष आणि 21 नेते समोर येत आहेत. मग ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो या सोनिया गांधी. पण हे 21 लोक एक होऊन मोदी होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Read Also :
- चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
- “तुम्ही मराठी माणसाला सत्तेसाठी वाऱ्यावर सोडलं,” राऊतांवर भाजपचा पलटवार
- “बेळगावला महाराष्ट्रात घेण्याचा ठराव संमत करून दाखवा!” राऊतांचं भाजपला आव्हान
- मोठी बातमी! ठाकरे सरकारची पोलखोल करणाऱ्या सोमैय्यांना आता ‘Z’ दर्जाची सुरक्षा
- ‘या’ अधिकाऱ्यावर होती हिरेनच्या हत्येची जबाबदरी, NIA च्या आरोपपत्रात मोठा खुलासा