औरंगाबाद – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसला वगळून भाजपविरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा लागेल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले होते. यावरून शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून काँग्रेसला सक्षम विरोधीपक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार खोचक टोला लगावला. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला वगळून कोणताही फ्रंट तयार होऊ शकत नसल्याचं आज स्पष्ट केलं. यूपीएचं अस्तित्व नाही ही गोष्ट सत्य आहे. ममता बॅनर्जींच्या म्हणण्यात दमही आहे. पण काँग्रेसला दूर ठेवून कोणताही फ्रंट बनू शकत नाही. काँग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनवणं योग्य नाही. मध्यप्रदेशात, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यातही काँग्रेस आहे. काही राज्यात काँग्रेस कमजोर आहे. पण काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं नाही. काँग्रेसला इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून काम केलं तर चांगला फ्रंट तयार होईल, असं राऊत म्हणाले.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यावरून दोन वकिलांमध्ये होणार संघर्ष; सदावर्ते विरुद्ध परब संघर्ष न्यायालयात होणार सुरु
- पुणे जिल्हा बँकेच्या रिंगणात तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री; वळसे-पाटलांचा देखील अर्ज दाखल
- राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
- ‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
- सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद