मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या तरी स्थिर आहे. तरी देखील अनेकांच्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा बोलक्या होत आहेत. त्यातही आपापल्या वडिलांच्या राजकीय छत्रछायेखाली वाटचाल करणाऱ्या राजकीय लेकींच्या म्हणजेच दोन महिला नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा नुकत्याच समोर आल्या आहेत. त्या लेकी म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे.
एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेवर भाष्य केले आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे वाक्य मूळात मी उच्चारले नव्हते. पण हे वाक्य उच्चारले म्हणून असे काय मोठे आकाश कोसळले होते?, असा सवाल त्यांनी करून मनातला सलच उलगडून दाखवला आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषय काढून एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी आपली महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा जाहीर करून घेतली आहे.
राजकीय खेळी करून राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने रंगत वाढवली; भाजपचा तिसरा उमेदवार मैदानात
तर पंकजा मुंडेंसारखेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे तुळजापूरच्या दौर्यात त्यांनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री या विषयावर आपले मत मांडले. कोणालाही मुख्यमंत्री करणे हे जनतेच्या हातात आहे. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर सगळ्या पक्षाला घेऊन नवस फेडायला येईन, असे वक्तव्य त्यांनी करून स्वतःची देखील महत्त्वाकांक्षा एक प्रकारे जाहीर केली आहे.
धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिकांचा दावा
महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकीय इतिहास पाहिला तर महत्त्वाकांक्षा उघडपणे आपल्या तोंडून बोलणारे फार क्वचित प्रसंगी सर्वोच्च पदावर चढलेले दिसतात. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची मुले मुख्यमंत्री झालीच नाहीत असे अजिबात नाही. अशोक चव्हाण यांचे उदाहरण यासाठी नजीकच्या इतिहासात घडले आहे. पण शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन असा शब्द दिला होता, असे सांगत स्वतः उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत. पण त्यांनी स्वतःची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवलेली नव्हती. हा मुद्दा येथे अधोरेखित करावासा वाटतो. अशोक चव्हाण काय किंवा उद्धव ठाकरे काय हे आपापल्या पक्षांचे त्या त्या वेळचे प्रमुख नेते आहेत.
‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
राजकारणात चांगलाच अनुंभव आणि हातखंड जायचं होता ते खुद्द गोपीनाथ मुंडे यांना देखील मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा होती. पण त्यांनी ती फारशी कधी उघडपणे बोलून दाखवली नव्हती. इतकेच काय दस्तुरखुद्द शरद पवारांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. पण ती फक्त 1991मध्ये त्यांनी ती बोलून दाखवली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला तशी महत्त्वाकांक्षा नाही असेच सांगतात.
परंतु त्यांच्या लेकींनी आता मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा बोलून दाखवली. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे अजूनही आपल्या पिताश्रींच्या राजकीय छत्रछायेतच वावरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. तसेच त्यांचा कार्य देखील खूप आहे. मात्र नुसती महत्त्वाकांक्षा बोलून स्वतःचे स्वतंत्र राजकीय कर्तृत्व कसे सिद्ध होईल? असा प्रश्न त्यांचा इच्छेपुढे उभा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल का? दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात अजूनही महिला मुख्यमंत्र्यांची नोंद नाही. त्यामुळे पुढील कालखंडात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हि महिला होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंची संधी हुकली; धनंजय मुंडेंनी काढला चिमटा
दरम्यान, राजकारणामध्ये जाहीररीत्या महत्वाकांक्षा बोलून दाखवणे कायमच पदे मिळवताना घातक ठरलेली आहे. मग अशा वेळी मूळातच ज्यांचे राजकीय कर्तृत्व मोठ्या नेतृत्वाच्या छत्रछायेखाली आहे म्हणजे एक प्रकारे कुंठित आहे त्यांच्या महत्त्वाकांक्षा नुसत्या बोलून कशा पूर्ण होतील? त्यातही महत्त्वाकांक्षा जाहीररीत्या बोलून दाखवल्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांचा सामना तसेच पक्षबाह्य विरोधकांचा सामना अधिक तीव्रतेने करावा लागतो हा इतिहास आणि वर्तमान आहे. या विरोधाला महत्त्वाकांक्षा असणाऱ्या नेत्यांना तोंड कसे देता येईल? या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणे अपेक्षित आहे.
Read also:
- “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
- मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा
- केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”
- राष्ट्रवादीला सेनेचा मुख्यमंत्री नको की सेनेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री नको? महाविकासआघाडीत नवी वादाची ठिणगी?