यवतमाळ : सध्या यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यात मंगळवारी उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव नजीक नाल्यात पुराच्या पाण्यात बस वाहून गेली त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर एक एसटी चालक अजूनही बेपत्ता आहे. अशा प्रस्थितीत जर जिल्ह्याचे पालकमंत्री गायब राहत असेल तर नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे घेऊन जायचं अशा सवाल या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.
शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा
पण जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आल्याने पालकमंत्र्यांचे यवतमाळ जिल्ह्याकडे स्पेशल दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसा आधी एका कार्यक्रमाला भेट देऊन काही बैठका घेतल्या तेव्हा पासून पालकमंत्री संदिपान भुमरे गायब आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन देशात ओळखला जातो. याआधी संजय राठोड हे जनता दरबार घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. पालकमंत्री असताना देखील त्यांनी ही जबाबदारी योग्य रित्या पार पाडली. पण पालकमंत्री यांच्याकडे जिल्हाचे पालकत्व देण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिक पालकत्व पासून वंचित आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ
पालकमंत्रीच जर जिल्ह्यात येत नसेल तर त्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या समस्या सोडवणार तरी कोण? पालकमंत्री पैठण येथील आहेत. दहा ते पंधरा दिवसातून एकाद्या वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि बैठक घेऊन पुन्हा मुंबई कडे रवाना होतात. त्यामुळे पालकमंत्र्यांची प्रशासनावर वचक नाही. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ही पालमंत्र्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकत्व देण्याची मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे.
Read Also :
- पावसाने सगळ उद्धस्त केलं, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले
- नाशिककरांना सतर्कतेचा इशारा: गंगापूर, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले, अनेक गावांत पाणी शिरण्याची शक्यता
- शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ED ने पाठवली आणखी एक नोटीस
- कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही – हसन मुश्रिफ
- सोमय्याची तक्रार स्वीकारणारे पोलिस अधिकारी आर. आर. पाटीलाचे सख्खे भाऊ; मुश्रीफांवर कारवाई करणार?