मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली नाही. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप सुरुच ठेवला आहे. यामुळे कर्मचारी स्वतःचे नुकसान करत आहेत. तसेच लोकांचेही नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांनी अधिक ताणू नये अन्यथा बडतर्फ करण्याची कारवाई करु असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांशी संवाद सुरु आहेत. वेगवेगळ्या शिष्ट मंडळांशी चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.
“भारतीय जनता पक्षाचं “संबंधित पात्र” पुन्हा बरळलं”; रुपाली ठोंबरेंचा संबित पात्रांवर हल्लाबोल
परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यांमान दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे की, एसटीच्या बाबत कामगारांना मोठ्या प्रमाणात समजवण्याचा प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगवेगळ्या शिष्टमंडळांना भेटत असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु काही कर्मचारी अद्यापही मागणीवर ठाम आहेत. हायकोर्टाने देखील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, एवढे दिवस आंदोलन सुरु ठेऊ शकत नाही. न्यायालयाच्या अवमानाबाबतची नोटीस प्रत्येक आगारात लावा असे कोर्टाने राज्य सरकारला सांगितले आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु एसटी कर्मचाऱ्यांशी आपले वैर नाही असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
एसटीच्या संपामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना फार मोठा त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांशी जसे दायित्व आहे तसेच जनतेशी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जास्त ताणू नये कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, यामध्ये त्यांचे नुकसान होत आहे कोणत्याही नेत्याचे नुकसान होणार नाही आहे. कर्मचारी स्वतःचे नुकसान करत आहेत हे नुकसान कधीही न भरुन येणारे आहे असे अनिल परब म्हणाले आहेत.
Read also:
- “१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
- फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
- ४0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव, जीन्स घालणाऱ्या मुलींवर नाही, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान
- एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
- नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं ‘ते’ पद घेतलं काढून…