मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा गेली अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारन मोठा निर्णय घेत पहिल्या टप्प्यात काही गडांच्या संवर्धन करण्याचे ठरवले आहे.
राज्यातील गड-किल्लय़ांचे पावित्र्य जपून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वाच्या सूचना आणि विचाराने आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Read Also :
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’
- ‘पायी वारीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता’
- ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’
- ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’