कोल्हापूर : घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. ‘ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे. त्यांचे सर्व घोटाळे आम्ही उघडकीस आणणार आहोत. वर्षभरात दोन डझन घोटाळे बाहेर काढले असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ गायब होईल, नाहीतर दवाखान्यात असेल. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा तिसरा आरोप करण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
किरीट सोमय्या हे सकाळी 8 च्या सुमारास कराडहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी कराडमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी, संचालकांनी सोमय्यांची भेट घेतली. किरीट सोमय्या सकाळी 10.30 सुमारास कोल्हापुरातील अयोध्या हॉटेलवर पोहोचतील. तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पुढे 11 वाजता महालक्ष्मी मंदिराकडे रवाना होतील. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर ते थेट 11.30 च्या सुमारास तक्रार देण्यासाठी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल होतील. यानंतर 4 वा. ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. यावेळी किरीट सोमय्या आज हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्या घोटाळ्याचा आरोप करण्याची शक्यता आहे.
Read Also :
- कात्रजचा खून झाला…; पुण्यातील बॅनरमुळे उडाली एकच खळबळ
- नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार; चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच
- काँग्रेसचे नेते मेले होते, उद्धव ठाकरेंनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत – आमदार जैस्वालाच वक्तव्य
- तळेगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदरवारांची चाचपणी सुरू; महाविकास आघाडी पॅटर्न राबविणार का?
- शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा