कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केरळमधील 40 डॉक्टर्स आणि 35 नर्सेसचे पथक मुंबईत आले होते. मात्र पगार न दिल्याने हे पथक नाराज होऊन माघारी परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केरळचे डॉक्टर माघारी परतणार, महापालिका आणि राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी…
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आणि मनुष्यबळ कमी असताना केरळहून बोलावलेल्या डॉक्टर्सना कबूल केलेले वेतनही न देणे हा देशात महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा लांछनास्पद प्रकार आहे. pic.twitter.com/pOtcAIimkd— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2020
या संदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आणि मनुष्यबळ कमी असताना केरळहून बोलावलेल्या डॉक्टर्सना कबूल केलेले वेतनही न देणे हा देशात महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा लांछनास्पद प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्याकडे साखर सम्राटांची कर्ज माफ करायला पैसे आहेत, परंतु करोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचे पगार द्यायला नाहीत, राज्य कुणासाठी चालवलं जातंय हे यावरून पुरेसे स्पष्ट होते आहे @OfficeofUT @PawarSpeaks @JaiMaharashtraN pic.twitter.com/PbSQqwQM8n
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2020
राज्याकडे साखर सम्राटांची कर्ज माफ करायला पैसे आहेत, परंतु करोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचे पगार द्यायला नाहीत, राज्य कुणासाठी चालवलं जातंय हे यावरून पुरेसे स्पष्ट होते आहे, अशी टीका भातखळकर यांनी सरकारवर केली आहे.