मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही असे सर्वोकंच न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राज्यसरकारला या विषयच गांभीर्य नसल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे
ते म्हणाले’ “राज्यसरकारने खरे प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय मराठा समाजाच्या बाजूनी द्यावा लागला असता. सुप्रीम कोर्टाने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन कोरोनाच्या काळात इतर निर्णय घेतलेले आहेत पण राज्यसरकार या विषयाचं गांभीर्य दाखाऊ शकले नाही.”
राज्यसरकारने खरे प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय मराठा समाजाच्या बाजूनी द्यावा लागला असता. सुप्रीम कोर्टाने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन कोरोनाच्या काळात इतर निर्णय घेतलेले आहेत पण राज्यसरकार या विषयाचं गांभीर्य दाखाऊ शकले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2020