शिक्षकांच्या बदल्यांमधील वशिलेबाजी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने, विशेषकरुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबले होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आले.
ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे भ्रष्टाचार आणि शोषण होईल, असा दावा भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी पंकजा यांनी केली. पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदी असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत घेतलेला निर्णय ठाकरे सरकारने बदलला होता.
“कोरोना’च्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले. ज्याचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या off line पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा offlineचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल राज्यसरकार ने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे..पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 16, 2020