कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत दिले असून नागरिकांना जागरुक करणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी प्रशासनाला लॉकडाऊन पूर्वी पुरवठा व्यवस्था सुदृढ करून यासंदर्भात रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. रिपोर्ट आल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल. दरम्यान रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मात्र याचा विरोध केला आहे.
ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे गरीब लोक धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित होतात. त्यामुळे पुरवठा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लॉकडाऊनचा उद्देश नागरिकांना जागरुक करणे हा आहे. लोकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल, असा संदेश याद्वारे देण्यात येणार आहे. लॉकडाऊन कधीपासून लागू केले जाईल, याची माहिती नागरिकांना अगोदरच दिली जाईल. त्यामुळे ते यासाठी तयार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले