पुणे : कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले होते. आता रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही संकट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंधांचे संकेत दिले आहेत.
रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येतील असे म्हटले आहे.
राज्यातील अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अशा जिल्ह्यातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत आहोत. त्यामुळे आणखी आठ दिवस आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिथे गरज आहे. फक्त त्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.
कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढत असल्याची प्रशासनाकडून आकडेवारी येत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध कडक करायचे का, हे येत्या आठ दिवसांत ठरवू, असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप
- अभय बंग महान सामाजिक नेते, त्यांच्यामुळेच राज्य व्यसनमुक्त झाले; वडेट्टीवारांचा टोमणा
- राजकारण नव्हे; शिवसेनेची विचारधाराच चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर
- जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही ? – विनायक मेटे