महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थिती बद्दल माहिती दिली. तसेच कोरोना लढ्याविरोधात मुंढे यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. “जर कोरोना रोखायचा असेल तर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजून आपण खबरदारी घेणे. जर तसे नियम पाळले तर आणि तरच कोरोनाला दूर ठेवू शकतो” असं तुकाराम मुंढे म्हणाले.
“नागरिक नियमांचं पालन करत नाहीत, आजार लपवतात, त्यामुळे नागपुरात मृत्यू वाढले. पण नागपुरात अजूनही परिस्थती नियंत्रणात आहे. मात्र, आजच्या स्पीडने कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला
नागपूरात लॉकडाऊन करायचं असल्यास 14 ते 15 दिवसांचं करणार, सोबत कर्फ्यू असेल. लॉकडाऊन करण्यापूर्वी २-३ दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊन असेल तर बाहेर पडता येणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावलं.