मुंबई : भाजपसोबत युती करून २०१९ च्या निवडणुकांचा प्रचार केल्यांनतर, ऐनवेळी युतीचे फिस्कटले आणि भाजप-शिवसेनेने युतीची गाठ सोडली. त्यांनतर शिवसेनेने राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यांनतर भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढत गेलेलाच दिसून येत आहे. भाजप नेते शिवसेना नेत्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत, तर शिवसेने नेतेदेखील भाजपवर प्रत्यारोप करतात.
शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला असून, ‘शिवसेनेचा खरा चेहरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेने फोटो कमी केला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी होते,’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने बेईमानी केली,’ असा थेट आरोप देखील त्यांनी केला आहे.
२०२४ नंतर जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाईल तेव्हा त्यांची लाख्तरं जनता फाडल्याशिवाय राहणार नाही..! @BJP4Maharashtra @TV9Marathi @MiLOKMAT @abpmajhatv @zee24taasnews pic.twitter.com/ejZBL3g19x
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 19, 2021
पुढे ते म्हणाले, ‘प्रत्येक पक्षात नेतृत्व करणारे नेते प्रचंड क्षमतावान असतात. त्यांचे नियोजन आणि काम करण्याची शैली निराळी असते. निश्चितच भाजपचे कर्णधार नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यात इतकी प्रचंड क्षमता आहे, की १९८४ मध्ये २ खासदार असलेल्या पक्षाला आज ३०३ खासदारांपर्यंत त्यांनी नेलं. आता आगामी लोकसभा निवडणुकीत हा आकडा आणखी वाढेल, कारण अशीच त्यांची कार्यशैली आहे. आमच्यासाठी मोदी देशाचा गौरव आहेत आणि जगासाठी विश्वगौरव आहेत,’ असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
स्व.बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जरी कमी केला तरी, शिवसेनेची किंमत शून्यापेक्षा कमी आहे..! @BJP4Maharashtra @MiLOKMAT @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi pic.twitter.com/NHx9XCVQ7i
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 19, 2021
तसेच, ‘भाजपने युती तोडली हे म्हणणं म्हणजे जगातील आठवं आश्चर्य आहे. ज्यादिवशी निकाल हाती आले. भाजपचे १०५ आमदार जिंकून आले होते. भाजपच्या मदतीशिवाय कुणालाही सरकार स्थापनं करणं कठीण आहे, असं आम्हाला वाटलं. पण तेव्हाच निकालाच्या दिवशीच सेनेने पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाची भूमिका मांडली. त्यांनी कधीच युतीसाठी प्रयत्न केला नाही. मात्र, आता त्यांचा खरा चेहरा समोर आला असून, बेईमानीचं आयुष्य फारकाळ टिकत नाही. २०२४ ला जनता मविआ नेत्यांची लक्तरे फाडल्याशिवाय राहणार नाही,’ अससी घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.
Read Also :
- सोमय्यांवरील कारवाईत पवारांचा हस्तक्षेप? वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
- ‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
- भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
- ‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील