केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.
नगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठलीही तयारी केली गेली नाही. केंद्र शासनाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी चार कोटी रुपये नवीन कर्मचा-यांची भरती करण्यासाठी आहे. परंतु अद्याप एकाही कर्मचा-यांची भरती केली गेली नाही. अशी माहिती सुजय विखे यांनी दिली आहे.
“मी स्वत: लक्ष घातले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आयसीयू सेंटर उभे राहिले. त्याचबरोबर महापालिकेशी करार करून कोवीड चाचणी सेंटर सुरू केले. त्यामुळे हा आकडा वाढला आहे”, असेही सुजय विखे म्हणाले.