मावळ : कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यापासून राज्यासह देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता, आरोग्य प्रशासनानं कडक नियमांसोबतचं लसीकरणावर भर द्यायला सुरुवात केली आहे. अशात एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना लसीकरणासाठी होणारी गर्दी डोकेदुखी ठरत आहे. मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आमदार सुनिल अण्णा शेळकेंनी चिठ्ठीचा प्रयोग केला आहे. “चिठ्ठी घ्या आणि नंबर आल्यावर लसीकरणाला या”, असा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे, लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न सुटला आहे. परंतू, या उपक्रमात राजकीय हव्यापोटी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यांकडून नागरिकांची दिशाभूल केल्याचे बोलले जात आहे.
राज्यात कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत असताना, लसीकरणासाठी आलेले लोकं रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी करत होते. दरम्यान अनेक तास त्यांना रांगेत उभं राहावं लागत होतं. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत होता, तसेच लशीसाठी रांगेत उभं राहिल्यानं वेळही वाया जात होता.
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल अण्णा शेळक यांनी टोकन पद्धतीचा अवलंब केला आहे. या मावळातील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना नाव, वय, मोबाइल नंबर आणि कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन याबाबतची माहिती चिठ्ठीवर लिहून देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांचा कितीवेळा नंतर नंबर येईल.
त्यानंतर लशीच्या उपलब्धतेनुसार नागरीकांना बोलावलं जातं आहे. दरम्यान, यासाठी नागरिंकांना लसीकरणाची नाव नोंदणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांची ऑनलाईन नाव नोंदणी झाली नाही, अशा रुग्णांची तात्काळ नावनोंदणी करून त्यांना टोकण देण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील टोकन उपक्रम हीट ठरत असल्याने लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. त्यामुळे आमदार शेळके यांच्या उपक्रमाचे मावळ वासीयांकडून कौतूक करण्यात येत आहे. परंतू, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडून शेळकेंच्या टोकण उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
सध्या राज्यात सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्या मुळे राज्य सरकारने ४५ वर्षावरील नागरिकांचा दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनाप गर्दी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे वयोवृद्ध नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे, त्यामुळे ही टोकण पद्धती वापरण्यात येत असल्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी सांगितले.
रेकॉर्डिंग मुळे आरोपांचे बिंग फुटले!
वसिलेबाजीमुळे लसीकरणत केल्या जात असल्याचे सांगत केदर मेंढी नावाच्या व्यक्तीची चिठ्ठी सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाली होती. यावरून मावळातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र केदर मेंढी यांच्या रेकॉर्डिंगमुळे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्यावरील आरोपांचे बिंग फुटले आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. रांगेत उभा राहिलेल्या नागरिकाला माहित नसते की लस उपलब्ध आहे किंवा नाही. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टोकण दिले जात आहे. टोकण मिळाल्यावर सुद्धा रांगेत उभे राहावे लागते. कोणत्याही प्रकारची वसीलेबाजी केल्या जात नाही, असे केदर मेंढी यांनी सांगितले आहे.