मुंबई : राज्यातील अनेक नेते जे कधी काळी आमच्यासोबत होते त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली आहे. मात्र आज झालेल्या १८ मंत्र्यांच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील 17 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याबाबत त्या बोलत होत्या.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
देशात पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची आहे, मात्र आजच्या शपथविधीत एकाही महिलेला स्थान न देणे हे धक्कादायक आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वक्तव्ये अनेकदा महिलांचा मानसन्मान करणारी नसतात. महिलांनी स्वयंपाकघरात जावे, स्वयंपाक करावा असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते, असे ताशेरे सुप्रियाताईंनी सत्ताधाऱ्यांवर ओढले. या मंत्रिमंडळात आमच्यासोबत असलेले अनेक चेहरे दिसत आहेत. आम्ही एकत्रित राज्याची कामेही केली आहेत. अशा लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षे भाजपमध्ये सतरंजी उचलण्यापासून अनेक कामे अनेकांनी केली पण त्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत, याउलट आमच्यामधील हुशार लोकांना ही संधी मिळाली, असे सुप्रियाताई म्हणाल्या.
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी भूमिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडली.
एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
दरम्यान, उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही हा महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांवर मोठा अन्याय झाला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे कदापि शोभणारे नाही. असं काॅंग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होताच, बिहारमध्ये नितीश कुमारने भाजपची सोडली साथ”
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”