मुंबई : राज्याच्या राजकारणात भेटी गाठींचा सिलसिला सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का झाली याचं कारण अस्पष्ट असले तरी सुप्रिया सुळे यांनी चर्चेसाठी भेट घेतल्याचं फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.
माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा केली.@NCPSpeaks@EknathGKhadse pic.twitter.com/kli7JS7BCb
— Supriya Sule (@supriya_sule) June 9, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेतली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भेट घेतली होती. त्यामुळे आता खडसे आणि सुप्रिया सुळे यांच्यात काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं – रक्षा खडसे
३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठा पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.
शरद पवार भेटीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती,” असं देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
फडणवीसांवर खडसेंनी केले होते गंभीर आरोप
एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता.
Read Also :
- मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले
- मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य करणं योग्य नाही – जयंत पाटील
- “उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा”
- मुंबई तुंबली नागरिकांचे हाल; महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा – शेलारांचा आरोप
- विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं