नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झालेले आहे. याठिकाणी आता लवकरच पोटनिवणूक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्ष आता या मतदारसंघात ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि ठिकठिकाणी छुप्या बैठका देखील सर्व पक्षांकडून सुरु झालेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे. आता काँग्रेस आपला गड राखणार की पंढरपूर-मंगळवेढ्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष इथं धक्का देणार याकडे सर्वांच्याच नजरा आता लागल्या आहेत.
हे पण वाचा, बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवणार; आमदार आशिष शेलार यांची ग्वाही
हे पण वाचा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. येत्या काही दिवसांमध्ये देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांनी विविध पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरु केलेली आहे. अशातच आता या मतदारसंघातून लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी आमदारकीची उमेदवारी मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले आहे.
हे पण वाचा, काँग्रेसने अशोक चव्हाणांकडे दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
हे पण वाचा, नाईलाजास्तव भाजपमध्ये गेलेल्या अस्वस्थ नेत्यांची घरवापसी करावी लागेल – अशोक चव्हाण
देगलूर-बिलोली विधानसभा राखीव मतदारसंघातून निवडूक लढवण्याची इच्छा त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे केली आहे. जर मला शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी संधी दिली तर मी देगलूर विधानसभा लढवून आमदारकी जिंकेल आणि जनतेची सेवा करेल अशी प्रतिक्रिया सुरेख पुणेकर यांनी दिली आहे. सुरेखा पुणेकर यांनी याआधी देखील अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं होत की महाराष्ट्रात लोककलेचा प्रसार करण्यासाठी तसेच लोककलावंताचे प्रश्न उचलण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे असे त्या म्हटल्या होत्या.
हे पण वाचा,
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले
फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला
“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत” – पी. चिदंबरम