मुंबई : राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊन ज्या माता-भगिनींना आपले पती गमवावे लागले आहेत, अशा एकल महिलांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला बालविकास विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आहे. यासाठी राज्यात महामारीच्या फैलावला सुरुवात झाल्यापासून ते ३० ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या कालावधी निश्चित करण्यात आला असून, अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याची लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी बैठकीत मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण
त्यानुसार अशा महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेतली होती. त्याला बैठकीला खा. सुप्रिया सुळे, संबंधित विभागांचे प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. तसेच, एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने जयाजी पाईकराव, हेरंब कुलकर्णी, प्रतिभा शिंदे, रेणुका कड व अल्लाउद्दीन शेख उपस्थित होते. यावेळी, पती गमावलेल्या एकल महिलांचा संसार सावरण्यासाठी त्यांच्या पाठीशी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे सरकार उभे राहील,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
कुणीही कायमचा शत्रू नाही, काहीही चमत्कार होऊ शकतो!
तसेच, ‘त्यासाठी शासनाच्या सध्याच्या योजना, प्रस्तावित योजनां आणि गरज पडल्यास आणखीन नावीन्यपूर्ण योजना तयार करून त्यांचे सक्षमीकरण केले जाईल. गरज पडल्यास तसा कॅबिनेटमध्ये नवीन प्रस्तावही आणला जाईल,’ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले, तर खा. सुप्रिया सुळे यांनीही, ‘एकल महिलांचे मालमत्ताविषयक अधिकार शाबूत राहावेत यासाठी, विविध विभागांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची व प्रयत्न करण्याची गरज आहे,’ अशी सूचना केली.
Read Also :