अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज वेगळे वळण मिळत आहे. मुंबई पोलिसांसह आता बिहार पोलीस आणि ईडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यातच आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस दबावाखाली असल्याचा गंभीर आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे कांग्रेस-संपोषित बालीवुड माफिया के दबाव में हैं, इसलिए सुशांत मामले में जिम्मेदार सभी तत्वों को बचाने पर तुले हैं। कांग्रेस बिहार की जनता को क्या मुँह दिखायेगी?
— Sushil Kumar Modi (@SushilModi) August 1, 2020
सुशीलकुमार मोदी यांनी ट्विट केले की, आधी बिहारच्या लोकांशी महाराष्ट्रात अयोग्य व्यवहार केला जात असे. आता काँग्रेस-एनसीपीच्या मदतीने टिकलेल्या उद्धव सरकारने तर हदच केली आहे. बिहारचा मुलगा असलेला सुशांत सिंह राजपूतचा तपास करण्यासाठी पोहचलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलीस सहकार्य करत नाही.
मोदी यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे, काँग्रेस बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जात आहे. असे करुन काँग्रेस बिहारमधील लोकांना काय तोंड दाखवणार?