अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाले असून पोलिसांचा उलटा तपास सुरु झाला आहे.मात्र आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवायला सुरुवात केली आहे.
सुरुवातीला पोलिसांनी सुशांतचे वडील, दोन बहिणी, नोकर मंडळी, जवळचे मित्र, मैत्रिणी यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. त्यानंतर सुशांत याच्याशी संबंधित चित्रपटातील मोठ- मोठ्या व्यक्तींना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले गेल्या महिन्याभरात तब्बल 35 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एवढे जबाब नोंदवल्यानंतर त्याचप्रमाणे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रेश्मा शेट्टी ,आशु शर्मा आदी बड्या लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलीस महत्वाच्या मुद्यापर्यंत पोहचले असतील, असे वाटत होते. मात्र, तस काहीच झाले नाही. पोलिसांनी आता ज्यांचे आधी जबाब घेतले होते. त्यांचे पुन्हा जबाब घ्यायला सुरुवात केली आहे. सुशांत याची बहीण मीतूला आज जबाबासाठी बोलावलं होतं. मात्र, ती आज येऊ शकली नाही. ती उद्या येण्याची शक्यता आहे. तर सुशांतचं जेवण बनवणारा नोकर नीरज याचा नुकताच जबाब घेण्यात आला.