बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाची गुंता दिवसोंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना दिसत आहे. यातच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सुशांतची आत्महत्या नव्हे तर होत्याच असल्याचे म्हटलं आहे. कोणालातरी वाचवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
“सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी चौकशीत टाळाटाळ करत आहे. मुंबई पोलिसांना सुशांतसोबत १३ तारखेच्या आणि ८ तारखेच्या पार्टीत कोण होतं हे माहिती नाही का? सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. रियाला शोधून चौकशी करावी, दिनू मोर्याच्या घरी पार्टीला मंत्री काय करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असे वळण लागले असून, बिहारमधील सर्व राजकारणीही या प्रकारची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करू लागले आहेत. बिहारमधील सर्व राजकारणी आणि पोलीसही मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी शंका उपस्थित करून लागले आहेत. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, यानिमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सर्व राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ठाकरे सरकारने हा तपास सीबीआयकडे देण्याचा विरोध केला आहे. तसेच बिहारमधून चौकशीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही राज्य सरकारनं १४ दिवस क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.