अभिनेता सुशांतच्या वडिलांनी वांद्रे पोलिस स्टेशनच्या डीसीपींकडे एक तक्रार केली होती. त्यामध्ये रिया चक्रवर्ती सुशांतला त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्यानेच हे प्रकरण आता पाटणात गेल्याचा दावा वकिलांनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता त्याच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वीच रिया चक्रवर्ती संदर्भात सतर्क केले होते.
वकिलांनी केलेल्या आरोपानुसार, रिया सुशांतला कंट्रोल करत होती. सुशांतला ती कुटुंबियांशी बोलू देत नव्हती. तिने सुशांतला कुटुंबियांपासून दूर केले होते. या क्राइमसाठी रियाने दूरची प्लॅनिंग केली होती. ती सगळ्या मेडिकल फायली घेऊन गेली होती. तो कमकुवत होता तेव्हा तिने त्याचा फोन देखील ब्लॉक केला होता.
सुशांतचे वडील विकास सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, “कुटुंबियांना एफआयआर दाखल करण्यासाठी दीड महिना लागला. कारण, कुटुंबीय मानसिक धक्क्यात होते. मुंबई पोलिसच आमच्यावर दबाव टाकत होते की या प्रकरणात मोठ-मोठ्या प्रॉडक्शन हाउसची नावे द्या.” तपास दुसरीकडे नेण्याचा मुंबई पोलिसांकडून प्रयत्न केला जात होता.