नागपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक टेकवतात. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा भारत उभा करायचा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याचे आठवले यांनी म्हटले.
“भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच आज काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.
Read Also :
- राज्यात महाविकास आघाडीचा हातात-हात; जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
- माजी मंत्री संजय राठोड यांनी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; पीडीत महिलेची पोलिसांत तक्रार
- मनसेची मोर्चेबांधणी : राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, २०२२ साठी खास रणनीती!
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप