मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका राज्य सरकारला बसु शकतो. मात्र यावर स्वाभिमानी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी याविरोधात भुमिका घेत मोठा पेच निर्माण केला. त्यामुळे स्वाभिमानी पक्षातून राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची हाकालपट्टी केली आहे.
“महाविनाश, महावसुली अन् मद्यविक्री” ; सरकारविरोधात फडणवीसांनी आरोपांची गरळ ओकली
देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. तसेच पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नव्हते. त्याचबरोबर मतदारसंघात देखील त्यांच्यावर नाराजीचा सुर होता. हिवरखेड याठिकाणी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हाकालपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत, फटाकेफोडत आनंद साजरा केला.
कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी संघटनेची 5 एप्रिलला बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायचं की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तशा प्रकारच्या सुचना राजू शेट्टी यांनी देखील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
“मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यात ३०० आमदारांना घरं बांधणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत विरोध केला आहे तर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, भाजपला जे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते महाविकास आघाडी सरकारने सोडविले आहेत. शेतकी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव असे अनेक प्रश्न सरकारने सोडविले आहेत. त्यामुळे सरकारमधुन बाहेर पडण्याचं काय कारण देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
- पेनड्राईव्हची फॅक्टरी यांनी काढली आहे का? संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढली; निवडणुकीसाठी तब्ब्ल २७ अर्ज दाखल
- “माझ्या शरीरात इंक टाकून हत्येचा कट रचला”; विधानसभेत नितेश राणेंचे सरकारवर धक्कादायक आरोप
- कोणीही ऐरे गैऱ्यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला