मुंबई: केंद्र सरकारने संसदेत ‘शेती विधेयकं’ पास केल्यानंतर देशातील शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला असून आता अनेक ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी या बिलांचा विरोध करताना ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवून आंदोलन केली होती. संसदेत ही बिलं पास झाली आहेत आणि आता राष्ट्रपती रामनाम कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
आता या कायद्यावरून महाराष्ट्रात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहे कारण महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता 25 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारला या कायद्याद्वारे काही वस्तूंंचे उत्पादन, पुरवठा आणि व्यापार नियंत्रीत करता येणार आहे, शेतीमालाला चांगला भाव मिळाला तरी तो कमी भावाने विकावा लागेल, मुळातच शेतकरी अडचणीत सापडला तर सरकार कुठलीही मदत करु शकणार नाही. अस संघटनेच्यात्यासंदर्भात मा.खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटलं गेलं आहे.
महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने ऊसाच्या दरासंदर्भात आंदोलने करत असते. ही संघटना पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये मजबूत आहे. आता या संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला किती प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं आहे.