मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवित हानी झाली असून, या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावरून भाजपच्या नेते त्यांच्यावर सडकून टीका करत असून, भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्र्यांनाही आपल्या निशाण्यावर घेतले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही माझे राजकीय शत्रू नाहीत. परंतु त्यांनी ८ दिवस जाऊन तिकडं राहावं. तिथं वातावरणही चांगलं आहे. कसं आहे हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही.” तसेच, संजय राऊत यांच्यानंतर आता महाराष्ट्रात विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार तो अजित पवारांना. मात्र, “सो चुहे खाकर, बिल्ली चली हज को.” आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, अशी खरमरीत टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.
तसेच, “आता अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा की ३ तासात पाहणी करून होत नाही; नाहीतर आता अजित दादांनीही ८ दिवस कोकणात जावं आणि “दादा” स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, अशी टोला त्यांनी अजित दादांना लागावला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या केलेल्या विधानाबाबत त्यांना विचारलं असता, “संजय राऊत काहीही म्हणू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर मी बोलू शकणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी, ‘मोदींनी कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही. गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. प्रत्येक राज्यातल्या मृतांच्या वारश्यांना त्यांनी प्रत्येकी २ लाखांची, तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाहीही दिली आहे,’ असे सांगितले आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता
- भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडेंना, आयटी ॲक्ट ६७ अंतर्गत पोलिसांनी घेतलं ताब्यात
- ‘ठाकरे सरकार वादळग्रस्तांसाठी खंबीरपणे उभे, पण फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे’
- आपच्या खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, मोदीजी कॅमेऱ्यासमोर आले अन् एकदम…
- देशात लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इन्स्टिट्यूट