इंदापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यामुळेच राजकीय डावपेचांना आणि आव्हान-प्रतिआव्हानांना उधाण आले असून, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, इंदापूरसह संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादीत येत्या काही दिवसांत यावरून ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, इंदापूरात माध्यमांशी संवाद साधताना, “इंदापूर तालुक्याचा आगामी आमदार काँग्रेसचाच असेल,” अशी घोषणा केली होती. त्यांच्या या विधानानंतर आता वडेट्टीवार यांनी, “इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,” असं विधान केलं आहे. त्यामुळे, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आव्हान दिलं असून, यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
मनसेने विविध ठिकाणी निर्बंधाची हंडी फोडून, नोंदवला ठाकरे सरकारचा निषेध
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील विधानसभेची जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर अनेक वादंग निर्माण झाले आहेत. तिकीट वाटपावरून अनेक वेळा दोन्ही पक्षांत नाराजी, तसेच तणाव देखील निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आवाराधन पाटील यांचे उदाहरण ताजे आहे. त्यांनी, काँग्रेसमध्ये २० वर्षे राहून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला कंटाळून काँग्रेस सोडत आहे, असा आरोप करत भाजपत प्रवेश केला होता.
“यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका
त्यामुळे, आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने काँग्रेस इंदापूरात नवीन चेहरा देणार आहे का? कि तालुक्यातील दिग्गज नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? अश्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच, भविष्यात इंदापूरची जागा कायम राष्ट्रवादीला राहील अशी परिस्थिती आज असताना, सत्तेतीलच घटक पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी अशी वक्तव्ये केल्याने, पवार घराण्यासाठी प्रतिष्ठेची असलेली इंदापूरची जागा आता नवे राजकीय मैदान बनणार असल्याचे स्पष्ट होते आहे.
Read Also :
- प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये रंगली जुगलबंदी; परळीतील कार्यक्रमात एकमेकांना काढले चिमटे
- ईडीच्या चौकशीला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर, ईडीला पत्र पाठवून सांगितले कारण
- मंदिरं दीर्घकाळापासून बंद, अण्णा इतके दिवस कुठं झोपले होते? राज ठाकरेंची चपराक
- चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून; तर…
- परिवहन विभागातल्या भ्रष्टाचाराची होणार लोकायुक्तांकडून चौकशी, अनिल परबांना धक्का