मुंबई : अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडल्यासारखी अवस्था झालेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न आज झालेल्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट बैठकीत झाला असून, यामध्ये राज्यातील शेतकऱ्यां आता ३ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज घेता येणार आहे. तसेच, या बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, या निर्णयांमुळे राज्यातील जनसामान्यांना थोड्या प्रमाणात का होईना अडचणीतून मुक्तता मिळणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. आज त्या घोषणेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या मान्यतेमुळे आता पीक कर्जाची योग्य वेळी परतफेड करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज ०% व्याजदराने मिळू शकणार आहे.
तसेच या मंत्रिमंडळ बैठकीत आणखीन काही निर्णय घेण्यात आले आहेत…
- राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन, ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य
- नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय
- तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज, दोन टक्के व्याज दर सवलत दिल्याने लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार
- दुय्यम न्यायालय आणि मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमणार
- शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार , हेरिटेज ट्री संकल्पना
- महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ
Read Also :
- “नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात”
- ‘सत्तेसाठी भाजपकडून ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप’
- अखेर राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबद्दल घेतला मोठा निर्णय!
- ‘आगमी पुणे महापालिका निवडणूकीसाठी गिरीशभाऊच असतील आमचे संकटमोचक …’
- ‘दुधापेक्षा पाणी महाग’; दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत थेट मंत्रालयाकडे