मुंबई : पहिल्या लाटेच्या तडाख्यानंतर त्यातून शिकवण घेऊन, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बचाव करण्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारं यश मिळवेल अशी आशा असताना, दुसऱ्या लाटेने देशात पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर उत्पात केला.
मोठी बातमी: संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या अंगावर कागद फेकले; १० खासदार निलंबित होणार?
आता या लाटेची तीव्रता कमी झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्यातले लॉकडाऊनसह इतर निर्बंध, महामारी बाधित रुग्णांची कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून पूर्णतः हटवले जाण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत
खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांची होणार SIT चौकशी, ७ अधिकाऱ्यांच्याद्वारे केला जाणार तपास
त्यामुळे, ज्या जिल्ह्यांत बाधित रुग्णांचे प्रमाण सलग ३ आठवड्यांपासून १% खाली आहे. अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः कमी करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून, या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
सध्या राज्यात असे १४ जिल्हे असून, त्यांची यादी आरोग्य विभागानं मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे मुख्यमंत्र्यांना आज यासंदर्भातला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला; राहुल गांधीचा पेगाससवरून हल्लाबोल
या अहवालानंतर राज्य सरकार राज्यातील निर्बंधासंदर्भात निर्णय घेतील. तसेच, हे करत असताना दुसरीकडे उद्योजकता वाढावी, यासाठी देखील छोट्या व्यापाऱ्यांना दुकानांच्या वेळेत वाढ करून दिली जाऊ शकते आणि काही निर्बंधांसह मुंबईच्या लोकलमध्ये सामान्य नागरिकांना सूट देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, अशी शक्यता सांगण्यात येत आहे.
Read Also :
- “फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
- पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली; विकास आराखडा लांबणीवर
- मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
- आघाडी सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त, पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर ; पडळकर यांची खोचक टीका
- अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र संकटात, नवी मुंबई महापालिकेने १ कोटी रुपयांची मदत करावी – आमदार मंदा म्हात्रे