मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांतल्या अंतर्गत कुरबुरी वाढत असून, त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने सत्तापलटाच्या संदर्भात वेगवेगळ्या वल्गना केल्या जात आहेत. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील एक महत्वाचं विधान केलं असून, त्यांच्या या विधानामुळे परत राज्यात सत्ताबदलाच्या चर्चांना पेव फुटले आहे.
रामदास आठवले आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, ‘अजूनही काही बिघडलेले नाही. वेळ गेलेली नाही. अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आजही शक्य आहे. आमची इच्छा आहे. आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा,’ असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तसेच, ‘हे फडणवीसांनाही मान्य आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी, ‘अजित पवार म्हणतात, “कोण लाल आहे, जो हे सरकार पाडून दाखवेल,” तर मी म्हणतो, तो लाल अजित पवारच आहेत,’ असा जोरदार टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर ‘दलित विरोधी सरकार’ असा आरोप केला आहे. ‘आज बाळासाहेब असते, तर हे सरकार आलचं नसतं. हे सरकार पूर्णपणे त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे,’ असं म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Read Also :
- “लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये” – संदीप देशपांडे
- ‘त्यांचं माहिती नाही पण आम्ही मात्र निवडणूका स्वतंत्रपणे लढवणार’ – नाना पटोले
- राष्ट्रवादी-शिवसेनेच्या युतीचे भाकीत करून पवारांनी काँग्रेसला धमकी दिली – नारायण राणे
- ‘हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे.’
- ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ