नंदुरबार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, मी मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांनी शब्द फिरवला का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेलं पॅकेज अद्याप जनतेपर्यंत पोहोचलं नाही. अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी काल नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत केली.
हे पण वाचा: मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
पूरग्रसताना तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही. घोषित होत पण पोहोचत नाही, अस ठाकरे सरकारच पॅकेज असतं. या संकटाची व्याप्तीही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, असं शेलार म्हणाले.
हे पण वाचा: “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
यावेळी नंदुरबारमध्ये पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. २० जुलैपर्यंत ३ लाख ५ हजार हेक्टरपैकी १ लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. मात्र, पावसानं दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. २० हजारापेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा प्रश्नही शेलार यांनी विचारलाय.
हे पण वाचा: ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
शेतीची, पाण्याची अडचण असताना पालकमंत्री गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत. पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरु आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय. याबाबत भाजप आक्रमक पाऊल उचलेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
Read Also :
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर
- शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का, माजी मंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा – नाना पटोले