मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता या बातम्यांना पुष्टी मिळाली असून, आज संध्याकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असून, एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित होतंच. त्यांच्यासोबतच भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत. या केंद्रीय मंत्रिमंडळाचा अवघ्या २ तासात विस्तार होणार असून, केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची अधिकृत यादी आता जाहीर केली. यात भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांचीही वर्णी मंत्रीमंडळात लागली आहे.
ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
- पूर्ण नाव कपिल मोरेश्वर पाटील. ५ मार्च १९६१ रोजी जन्म.
- बी.ए.पर्यंत शिक्षण.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश.
- १९८८ साली दिवे-अंजुर ग्रामपंचायतीत पहिल्यांदा सरपंच म्हणून निवड.
- ठाणे जिल्हापरिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड. अनेक पदं भूषवली.
- २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश.
- २०१४ साली भिवंडी मतदार संघातून लोकसभेचं तिकीट.
- देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय शिलेदार.
- कपिल पाटील समुद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पाठीराखे.
- २०१९ मध्ये पुन्हा एकदा खासदार म्हणून निवड.
- केंद्रात विविध संसद समित्यांवर सदस्य म्हणून काम.
- लोकसभेत, पक्षाचे व्हीप म्हणून जबाबदारी पार पाडली.
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
Read Also :
- नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास
- १५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर..वाचा सविस्तर..
- “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली” रुपाली चाकणकरांकडून राणा दाम्पत्याचा समाचार
- “मग प्रकरण दडपण्यासाठी फडणवीसांची ईडीने चौकशी का करु नये?”
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार