मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंत्री आणि खासदार असलेले डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे, तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली.
यामिनी जाधव प्रकरण शिवसेनेला जड जाणार? महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या
यावेळी, “मुंबईची महापालिका भाजपला जिंकवून देण्यासाठीच मी आलो आहे, महापालिकेवर आमचीच सत्ता असणार. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे,” असा घणाघात त्यांनी केला. दरम्यान, यावर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं असून, “भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल,” असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला आहे.
“बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना
तसेच, “दिल्लीतल्या सरकारला जनता कंटाळली आहे. संघाच्या सर्वेक्षणात जनतेशी संवाद कमी झाल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे ‘जन आशीर्वाद’ यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत,” असं सांगत, “मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजप नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली,” असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना वाद पुन्हा उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वा. सावरकर यांना वंदन करून त्यांनी, मुख्यमंत्री, महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. “राज्यातील जनता महाविकास आघडीला कंटाळली असून, सरकारकडून राज्याचा कोणताही विकास होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. गेल्या २ वर्षात जनता तुमच्या कारभाराला कंटाळली असून, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- २०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
- “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज