पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यावरून सध्या वादंग सुरू आहे. विरोधी पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांची चौकशी सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल. परंतु जर संजय राठोड दोषी नसतील तर त्यांना मंत्रिपद देऊ नये का? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
संजय राठोड दोषी आढळले असते तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद द्यावे म्हणुुन बंजारा समाजाला दिलेले वचन पाळले आहे. बंजारा समाजाच्या भावना होत्या त्यामुळेच संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद दिले आहे. या सोबतच मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत काहीच बोलत नाही. मी जर काही बोललो तर त्याचे टायटल होते. मला तो नको आहे. म्हणुन मी त्यांच्यावर बोलणे टाळतो, असंही दीपक कोसरकर म्हणाले.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
मंत्रिपदावरून आमच्यात कोणीही नाराज नाही. विरोधाकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळे ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. आधी म्हणत होते गेलेले परत येतील, मात्र आमचे संख्यावळ वाढतच आहे. अनेकांची नारीजी होती ती बाहेर आली. उठाव करायले धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्व आले असते, मात्र तसे झाले नाही, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
याबरोबरच, मेट्रो प्रकल्पामध्ये 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा बोजा जनतेवर पडत असतो. असो प्रकल्प थांबवून ठेवले तर किंमतीमध्ये वाढ होते. आरे मेट्रोमुळे प्रदुषण वाढणार नसून कमी होणार असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला. सुप्रिम कोर्टाने याबाबत परवानगी दिली होती. पर्यावरण रक्षण झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले जात आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.
Read also
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान