भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे . माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी देखील याप्रकरणी निंदा केली आहे . आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली .
फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.
मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
… अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
(2/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2020