सांगली : न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी झरे (ता. आटपाडी) येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. या आयोजनामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आमदार पडळकर यांना नोटीस बजावली आहे. शर्यतीला बैलगाड्या येऊ नयेत यासाठी आटपाडी तालुक्याची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच शर्यत स्थळासह झरे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आला आहे. यामुळे झरे गावला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसत आहे.
आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
बैलगाडी शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी घातली आहे. याबाबत बैलगाडी मालक व शर्यत शौकिनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान, बैलगाडी शर्यतींना मंजुरी मिळावी यासाठी बैलगाडी मालकांसह काही लोकप्रतिनिधी आक्रमक बनले आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी आटपाडी तालुक्यातील झरे येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. पडळकर यांनी शर्यतीची घोषणा केल्यापासूनच पोलीस प्रशासन आणि पडळकर हे आमनेसामने आले आहेत. शर्यतीमुळे कोर्टाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी आमदार पडळकर यांना नोटीस पाठवली आहे.
२०१५ च्या निवडणुकीत अस्मान दाखवणाऱ्या तृप्ती सावंतकडून नारायण राणेंचे जंगी स्वागत
कोणत्याही परिस्थितीत शर्यतीचे आयोजन होऊ नये यासाठी पोलिसांनी आटपाडी तालुक्याची नाकाबंदी केली आहे. तसेच झरे गावातून जाणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळवली आहे. शर्यत स्थळांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांची दिशाभूल करून अन्य ठिकाणी शर्यत होऊ नये यासाठी झरे परिसरातील सर्व गावांवर पोलिसांची नजर आहे. आमदार पडळकर यांच्या घराबाहेरही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतरही आमदार पडळकर शर्यतीचे आयोजन करण्यावर ठाम आहेत. यामुळे पोलीस आणि आमदार पडळकर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.
Read Also :
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- पिंपरी चिंचवडमधील स्थायीच्या अध्यक्षांना अडकवण्याचे सुनियोजित षडयंत्र; शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळांची नियुक्ती
- “राज्यातून ४० मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही!”, उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल