मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी केलेल्या ‘घंटानाद’ आंदोलनावर, तसेच मनसेने दहीहंडी साजरा करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावर जोरदार निशाणा साधत, “हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे,” असे सांगितले.
व्यस्त होते तरी परबांनी चौकशीला जायला हवे होते, चंद्रकांत पाटलांचे सूचक भाष्य
त्यांनी भाजपवर टीका करताना, “दुर्दैवाने काय झालेलं आहे, जनता जगली काय आणि त्यांचे प्राण गेले काय, यांना फक्त राजकारण करायचं आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असूनही यात्रा काढायच्या आहेत. त्यांचे जीव धोक्यात येतील असे समारंभ करायचे आहेत, का? तर जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. अरे कशाला आशीर्वाद हवेत जनतेचे आशीर्वाद? त्यांचे जीव धोक्यात घालायला? करोना काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला रोखण्यासाठी जे शिस्त व नियम आहेत, त्यांचे पालन करावेच लागेल,” असं आवाहन त्यांनी केलं.
मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण – LIVE https://t.co/ntgVJ8ODza
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2021
बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे
तसेच, मनसेवर हल्लाबोल करताना, “काही जणांनी म्हटलं, “दहीहंडी साजरी करा! नाही तर आम्ही अमूक करू… अरे, हे काय स्वातंत्र्य युद्ध नाहीये… की नियम तोडून आम्ही करून दाखवलं,” असं म्हणत, “जगात आज ज्या काही गोष्टी मानल्या जात आहेत. मग त्यात मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन असेल, ते करणे गरजेचे आहे. सणांच्या काळात संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली गेली असून, राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
दरम्यान, महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील, गणेशोत्सव, नवरात्र आणि कदाचित दिवाळी हे सण निर्बंधांतच साजरे करावे लागणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले असून, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये भारतात संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे आणि त्यात सर्वाधिक बाधित लहान मुले होणार असल्याचा इशारा देशाच्या टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मंदिरे आणि सार्वजनिक सण-समारंभांवर बंदी घातली आहे.
Read Also :
- घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका – किशोरी पेडणेकर
- ‘हे’ नियम पाळून पुणेकर साजरा करू शकतात गणेशोत्सव; पोलिसांकडून आचारसंहीता जाहीर
- इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान
- ईडीच्या चौकशीला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर, ईडीला पत्र पाठवून सांगितले कारण
- “यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका