मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकबाबत मोठं विधान केलं. लोकलबाबत राज्य सरकारने लोकांच्या मागण्यांचा विचार करावा. राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी उत्तर दिलं आहे. लोकल सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव आले असतील तर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.
शरद पवारांचं अमित शहांना ‘गोड’ निमंत्रण; पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? जाणून घ्या
आता राज्य सरकारनं राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. याचाच आधार घेऊन राज्य सरकारनं केंद्र सरकारला रेल्वे सेवा पूर्ववत सुरु करण्याची विनंती केल्यास आम्हाला काही अडचण नसल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगत शेवटी राज्य सरकार कोरोना स्थिती हाताळत असल्याचं असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांच अस झाल ‘नाचता येईना अंगण वाकडं’, मराठा आरक्षणावरुन दरेकरांची खोचक टीका
मुंबई लोकलबातच्या याचिकांवर पुढील गुरूवारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारला काहीतरी सकारात्मक तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानंही म्हटलंय की मीडिया हा लोकशाहीच्या मध्यभागी असलेला स्तंभ आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही राज्य सरकारनं लोकल प्रवासाबाबत विचार करायला हवा, असं आज मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
“वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
सोमवारी कोरोनाच्या दोन लस घेतलेल्या नागरिकांचे काय? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला. दोन लस घेऊन पण घरात बसावं लागत असेल मग लसीचा काय फायदा, असं म्हणत न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं आहे. लोकांचे प्रवासामुळे हाल होत आहेत. तासनं तास प्रवास करावा लागतोय. वाहतूक कोंडी वाढत चालली असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला म्हटलं आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही काही अडचणी असतील, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला म्हटलं आहे.
Read Also :
- कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका – उद्धव ठाकरे
- ४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही? – अमृता फडणवीस
- घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस
- निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने प्रस्ताव पाठवावा; मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मागितला होता का?
- ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत