पुणे : नवाब मलिक प्रकरण सध्या राज्यात चांगलचं गाजत आहे. दाऊद इब्राहिम संबंधित जमीन खरेदी व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. याचाच धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात राहाणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेतून काही विशिष्ट प्रवृत्ती मुंबईसह देश अस्थिर करू पाहाताहेत, असं चित्र स्पष्ट होतंय. या प्रवृत्तींना तातडीनं चाप लावा, असं मुख्यमंत्री उद्धवजींना आवाहन करतो.
संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
मुळात 2017 पासून इडीने तपास सुरू केलेल्या प्रकरणांची परिणिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेत झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित वगैरे ओरड करण्यात अर्थ आहे का? देशविघातक कारवाया करणाऱ्या तीन प्रकरणांच्या चौकशींतून झालेल्या कारवाईला विरोध कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही देशहिताच्या कारवाईला समर्थन देणार की नाही? उत्तर कृतीतून देण्याची आज संधी आहे. देशद्रोह्यांशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हद्दपार करा. त्यांचा राजीनामा नको, असा कुणाचा दबाव असेल तर तो झुगारून टाका, असं तुम्हाला आवाहन आहे.
Read also:
- संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे
- युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
- 4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
- ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?