औरंगाबाद : तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. पण आमच्याकडे एका तक्रारदाराने तक्रार केली. तक्रार करून गायब झाला. कुठे गेला माहीत नाही. दररोज धाड पडत आहे, केस सुरू आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग
ठाकरे म्हणाले, अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जातं. त्याचा खर्च परवडत नाही. 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ… खणलं जातंय… चौकश्या सुरू आहे. धाडसत्रं सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे, असं सांगतानाच न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. हे टीमवर्क आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजीनगर-औरंगाबाद उच्च न्यायालय विस्तार इमारत उद्घाटन सोहळा – LIVE https://t.co/EhmT3mD7PP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 23, 2021
इमारतीच्या भूमीपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला आलो हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. या इमारतीबाबत आपण ऐकला आहे. खंडपीठाचा इतिहास उपस्थितांना माहीत आहे. ही इमारत पाहिल्यानंतर मला वाटतं… ही इमारत पाहण्यासाठीही लोकं आली पाहिजे. त्यांना पकडून आणण्याची वेळ येऊ नये. मराठीत म्हण आहे शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. पण होतं असं कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं कोर्टात येणं जाणं होतं. दिपंकर रत्तूजी यांनी परवानगी दिली म्हणून मुंबईतील कोर्टाची इमारत लोकांसाठी खुली केली. व्हेरिटॉज वॉक म्हणून. एक कोर्ट रुम आहे. तिथेच लोकमान्य म्हणाले, स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे ही गर्जना केली. त्या वास्तूत गेल्यावर रोमांच येतात. आज तुमच्यासमोर मला बोलताना दडपण येतं. तेव्हा त्या सिंहाने त्या न्यायाधीशासमोर गर्जना कशी केली असेल या भावनेने रोमांच उठतात, असं ते म्हणाले.
Read Also :
- सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?
- राज ठाकरे यांची तब्येत बिघडली; मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे अचानक रद्द
- मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
- ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है; नांदेडमधील सभेत छगन भुजबळांचा शायराणा अंदाज
- मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील