मुंबई : जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल सुरू झाले असून बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाष्य केलं.
हेही वाचा.“भक्तांना वाटतंय भाजप सरकार आलं म्हणून संप निघायला लागलेत”, राष्ट्रवादीची भाजपवर टिका
जो रिटायर्ड होतो त्याला जगण्याकरता पेन्शन आणि सोशल सिक्युरिटी मिळाली पाहिजे, त्यासाठी काय करता येईल? त्याकरता आपण एक समिती तयार करू. आताचं दायित्व काय आहे. नंतरचं दायित्व काय आहे. यावर विचार केला जाईल. एकदा संपुर्ण दायित्व समोर आलं की चार-पाच पद्धतीने त्यावर वर्किंग करून त्यातून सोशल सिक्युरिटी, पेन्शनची सिक्युरिटी कशी द्यायची यावर विचार करता येईल. पण त्यावरच अडून राहिलो तर शक्य नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“राज्यात मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू, दादा कोंडके हवे होते, तरूणांना अटक कराल तर याद राखा,” संजय राऊत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की जुनी पेन्शन योजना आधी मान्य करा आणि मग अभ्यास करा. आधी कन्क्लुजन देऊन मग अभ्यास करणं याला अर्थ नाही. जी भूमिका मी घेतली ती भूमिका अजित पवारांनीही घेतली होती. जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीन ज्येष्ठ माजी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव, केपी बक्षी या समितीत आहेत. कर्मचारी संघटनांनी या समितीकडे जावं आणि त्यांचं म्हणणं मांडावं. आज लगेच कोणी रिटायर्ड होणार नाहीय. २०३० नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संप सुरू आहे. समजा, आज कोणी रिटायर्ड होणार असेल तरीही ती योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करू.
Read also
- हेही वाचा.“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी
- हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
- हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
- हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान