बॉलिवुडमधले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि भारतीय राजकारणातले दिग्गज नेते शरद पवार साहेब यांचं मैत्र काही और होतं. शैलीदार निसर्गसहज अभिनयाचं विद्यापीठ दिलीप कुमार यांनी सुरू केलं. दिलीप कुमारचं गारुड असलेली पहिली तरुण पिढी अर्थात पवारसाहेबांच्या वयाचीच. रजनी पटेल यांच्या मुळे शरद पवार आणि दिलीप कुमार यांची दोस्ती जमली. रजनी पटेल, दिलीप कुमार आणि शरद पवार यांची दोस्ती मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबाचीही जवळीक वाढली होती. एकमेकांच्या घरी, पर्यटन स्थळी हे सर्व एकत्र जात असत. यातून या मैत्रीची कमालीची घट्ट वीण निर्माण झाली.
महान अभिनेते दिलीप कुमार यांचं, वयाच्या ९८ व्या वर्षी काळ सकाळी मुंबईतल्या हिंदूजा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. दिलीप कुमार यांच्या जाण्यानं बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनयाची खाण आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून देशभरात ओळखले जाणारे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि संबंध हे केवळ एकाच क्षेत्रापुरते नव्हते. राजकारण आणि राजकारण्यांशीही त्यांचा संबंध आला.
दिलीप कुमार अत्यवस्थ आहेत हे कळल्यावर खा. शरद पवार साहेब त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तातडीने गेले होते. ६ जून २०२१ रोजी ही भेट झाली होती. सायरा बानू यांच्याशी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत साहेब चौकशी केली. तसेच दिलीप कुमार यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले व दिलीप कुमारजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिलीप कुमार यांनी त्याच्या आत्मचरित्रात एका नाजूक प्रकरणाबद्दल दिलीप कुमार यांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता शरद पवारांचा उल्लेख केला होता. सायरा बानू यांच्या विनंती वरून शरद पवार यांनी मदत केली होती. यामुळे दिलीप कुमार आणि सायराबानू यांचं आयुष्य पूर्ववत सुरळीत राहण्यास मदत झाली. यामध्ये बॅरिस्टर रजनी पटेल यांचाही सहभाग तेवढाच महत्वाचा होता.
या दोघांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे एकमेकांशी खूप घट्ट संबंध होते. याचा अनेक वेळा उल्ल्लेख आणि असे अनेक प्रसंग देखील पाहायला मिळाले आहेत, जेव्हा शरद पवारांच्या सभेला, भाषणाला दिलीप कुमार यांनी उपस्थिती लावली आहे आणि त्यांच्या चित्रपटांच्या प्रीमियरला शरद पवारांनी. आज देखील त्यांच्या निधनानंतर शरद पवार भावुक झाले होते.
दरम्यान, या दोघांच्यात एका कारणामुळे दुरावा निर्माण झाला होता. ज्याचा उल्लेख पवारांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर, संजय दत्तला घेऊन सरकारने थोडी नरमाई दाखवावी, अशी शिफारस करायला दिलीप कुमार, सुनील दत्त यांच्यासोबत पवारांकडे आले होते. मात्र, संजय दत्त विरोधातले पुरावे एवढे प्रबळ होते, की तेव्हा पवारांनी नाईलाजाने त्यांना नकार दिला. हा नकार दिलीप कुमार पचवू शकले नाहीत आणि त्यानंतर दोघांच्या मैत्रीच्या नात्यात तेढ निर्माण झाली. त्यानंतरही दोन्ही कुटूंबांचे एकमेकांकडे जाणे येणे चालू राहिले. पण शरद पवार आणि दिलीप कुमार यांच्या संबंधात अंतर निर्माण झाले. शरद पवार यांनी हे मैत्रीचे नाते दिलीप कुमारांच्या शेवटच्या क्षणापर्यंत निभावले.