पुणे : “मूळात ज्याच्या जाचामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली. जीव गमावावा लागला आणि इतके ढळढळीत पुरावे असताना सुद्धा, कोणाच्या सांगण्यावरुन हा मोकाट आहे किंवा कुणाच्या सांगण्यावरुन बेडया ठोकल्या गलेल्या नाहीत, की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहत आहोत” महिलेची तक्रार टीआरपीची न्युज कशी वाटते, या सरकारला सत्तेचा माज चढलायं, अशा तीव्र शब्दात चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्ला चढवला. त्या पुण्यातील नवी पेठे येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आ संजय राठोड यांनी एका महिलेला पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवली आहे. परंतू, पोलिस कोणतीही कार्यवाही करत नाहीत. पुणे पोलिसांची पुजा चव्हाण प्रकरणात दुपट्टी भूमिका दिसून येते, या सरकारला सत्तेचा माज चढलायं, त्यामुळे हायकोर्टाचे आदेश गृहखाते गुमानत नाहीत. पोलिस कार्यवाही करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री संजय राठोड यांनी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; पीडीत महिलेची पोलिसांत तक्रार
महिलेसोबत शरीरसंबंधाचे आरोप होताच राठोडांनी माध्यमांसमोर टीआरपीचे नाव देत स्पष्टीकरण दिले. माझ्यावरील आरोप खोटे असून माझे राजकीय करीअर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतू, त्या महिलेच्या तक्रारीमध्ये सरळ संजय राठोड यांचे नाव लिहिले गेले आहे. प्रत्येक वेळी संजय राठोडत नाव का येत?, कुठेतरी पाणी मुरतेय, तेव्हाच संजय राठोडांचे नाव येत आहे. महिलेची तक्रार टीआरपीची न्युज कशी वाटते, या सरकारला सत्तेचा माज चढलायं, चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसही दुपट्टी भूमिका मांडताना दिसून येत आहेत, अशा तीव्र शब्दात चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्ला चढवला.
Read Also :
- मनसेची मोर्चेबांधणी : राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, २०२२ साठी खास रणनीती!
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी