मुंबई : जून-जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले. यात सर्वात जास्त नुकसान झाले ते कोल्हापूर, रायगड, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे; परंतु या भागातील पूरग्रस्तांना सरकारकडून अजूनही मदत मिळाली नसून, ती तातडीने मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी १ सप्टेंबर पासून ‘पंचगंगा परिक्रमा’ सुरू केली असून, या परिक्रमेचा मार्ग कोल्हापूरच्या प्रयाग चिखली पासून नरसिंह वाडीपर्यंत आहे.
“…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
दरम्यान, या परिक्रमेला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत, राजू शेट्टी यांना आज सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्यांनी, “महापुरात ज्या-ज्या शेतकऱ्यांची पिके बुडाली, त्यांच्या पीक कर्जाला २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे माफी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटींनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट
“मुख्यमंत्र्यांनी २०१९ च्या धर्तीवर मदतीची घोषणा केली पण शासननिर्णय झालेला नाही. त्यामुळे, कॅबिनेटमध्ये याची चर्चा करुन निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. तसेच, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. देण्याचे सांगितले होते. आता शेतकरी अडचणीत असताना ते पैसे तातडीने मिळावे, अशी आमची मागणी होती. सरकारने त्याबद्दलची घोषणा केली असून, त्यापासून ते आता दूर जाणार नाहीत. पण मुख्यमंत्र्यांनी, शेतकऱ्यांना नक्की मदत देऊ म्हणाले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
१२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
तसेच, पुनर्वसनाच्या प्रश्नावर लोक सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. कारण, 32 वर्षापूर्वी पुनर्वसनाच्या नावाखाली मिळालेली जागा अजूनही त्यांच्या नावावर झालेली नाही. त्यामुळे, सरकारने दिरंगाईचे प्रकार टाळून, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे,” असा सल्ला देत, “आंदोलन मागे घेणार, असा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. आम्ही आंदोलनाचे शस्त्र खाली ठेवलेले नाही. पण चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे,” असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीने पाळली पडत्या फळाची आज्ञा, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार
यावेळी, “पूरग्रस्तांचे विनाअट पुनर्वसन करावे, त्यासाठी सरकारने आयएस दर्जाचा अधिकारी नेमावा आणि प्रश्न निकाली लावावेत, दरवर्षी येणाऱ्या पूरासाठी, वैश्विक तापमान वाढीसाठी सरकारने धोरण ठरवावे. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशाने पाणी अडवण्याबाबत निर्णय घ्यावा. त्यासाठी नवी धरणे बांधा, पाणी वळवा. केंद्रीय जल आयोगाकडून सर्वेक्षण करा, पाणी वाटपाचा मुद्दा सोडवा, कोल्हापुर, सांगली, कर्नाटकमधील १२० पूल पुराला कारणीभूत आहेत, त्यांचा प्रश्न निकाली काढा,” या मागण्या केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Read Also :
- विधानसभा पराभूत उमेदवारांवर मोठी जबाबदारी? पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
- महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; सण, उत्सव नंतरही साजरे करू शकतो; मुख्यमंत्र्यांच कळवळीच आवाहन
- “एक अनिल जेलच्या दरवाजात, तर दुसरा मुहूर्त शोधतोय,” किरीट सोमय्यांचा घणाघात
- पडळकर खऱ्या बापाची औलाद असतील तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, वडेट्टीवारांचे आव्हान
- “मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान